1. बाबूराव एकदा चीनची राजधानी पेकींग येथे कामानिमीत्त गेले होते. परंतु त्यांना चीनी भाषा काही
येत नव्हती आणि चीनी लोकांना इंग्रजीचा गंध नव्हता. त्यामुळे पहिल्याच मुक्कामी
बाबूरावांची पंचाईत झाली. ते ज्या हाँटेलमध्ये त्यांना काहीतरी फ़ळांचा रस पाहीजे होता.तरुण
वेटर मुलगी. तिला ते निरनिराळ्या खुणा करत आपल्याला काय पाहिजे ते सांगत होते. परंतु
तेवढ्याने काही जमेना. तेव्हा अचानक बाबूरावांचे लक्ष तिच्या गळ्यातल्या लाँकेटकडे गेले.
तेव्हा लाँकेटमध्ये एक सोन्याचे छोटेस सफ़रचंद लटकावलेले त्यांना दिसले. त्यांनी त्याकडे बोट
दाखवून ते पिळतात अशी खूण करत त्याचा रस मागितला. ती तरुणी लाजली व जरा वेळाने
बाबूरावांच्या टेबलावर ग्लासभर दूध घेऊन आली.


2. लढवय्या स्त्रियांनी स्त्री-मुक्ती चळवळ सुरु केली, तशी कोणी पुरुष मुक्ती चळवळ का सुरु करीत
नाही? एवढी हिंमत असलेले लढवय्ये पुरुष ( पक्षीः नवरे) आणायचे कुठून बायकांना कळलं तर?


3. चंद्रावरती दोन गुलाब' या गाण्यात गुलाब दोन का आहेत? ...बहुधा एक त्याच्या प्रेयसीच्या गालांवर
उमललेला व दुसरा चाचा नेहरु नेहमी बटणात खोवायचे तो असणार?


4. बिल क्लिटन हे आपली पत्नी हिलरी हिच्याशी किती एकनिष्ठ आहेत? ...मंत्रीपद स्वीकारतांना
घेतलेल्या शपथेशी आपले मंत्री असतात तितके.


5. काश्मीर पाकिस्तानला देऊन टाकले तर आपले संबंध नक्की सुधारतील का? ... असं काही नाही. नंतर
ते मुंबई मागतील.


6. वर्ल्डकप फ़ुटबाँलमध्ये भारतीयांचा सहभाग का नव्हता? ...एकमेकात लाथाडी करण्यापासून फ़ुरसत
मिळेल तेव्हा ना भारतीय फ़ुटबाँलला लाथ मारणार.


7. प्रुथ्वी गोल आहे कशावरुन? ...नील आर्मस्ट्रांगने चंद्रावरुन पाहिली तेव्हा त्याला ती तशी दिसली होती.
त्यावरुन आर्मस्ट्राँग फ़ेकत असेल तर अन्य कारणे भूगोलाच्या पुस्तकात दिली आहेत.


8. अमिताभ बच्चन व जिराफ़ यांच्यात काय साम्य आहे? ... दोघेही शाकाहारी आहेत.


9. पेन आणि बाँलपेन यात चांगले काय? ... परीक्षेत काँपी करायला की बँकेत खोटी सही करायला?


10. राम प्रधान यांच्या पराभवला शरद पवार जबाबदार आहेत काय? ... त्यांच्या स्वतःच्या मुलीला जन्म
सोडला तर शरद पवार हे अन्य कशालाही जबाबदार नाहीत.


11. म्हातारपणी लग्न करावं का? ... अवश्य, वधू तरुण असल्याशी कारण.


12. पुर्नजन्मावर तुमचा विश्वास आहे काय? ... नाही बुवा. गेले दोन जन्म मी पुर्नजन्मावर विश्वास
ठेवणं सोडून दिलंय.


13. पैसा माणसाचा अधःपात करतो. ...तो आपल्याकडे नसतो तेव्हा असेच म्हणायचे असते.


14. "के. ई. एम. हाँस्पीटलमध्ये लवकरात लवकर कसं जायचं?" "अगदी रस्त्याच्या मधोमध उभे रहा."


15. सचिन तेंडुलकर विषयी एक वाईट उदगार काढणे शक्य आहे का? ...सचिन तेंडुलकर बारावीत नापास
झाला होता.


16. सुनिलने एक कुत्रा पाळला. सहा महीने झाले, तरी तो कुत्रा नुसता खाऊन पिऊन गप्प बसायचा. अखेर
वैतागून एक दिवस सुनिल म्हणाला, 'अगं' मला वाटलं तू मोत्याला काही शिकवशील. दारातलं
वर्तमानपत्र उचलून आणाणं, परकं कोणी आलं तर इशारा देऊन आपल्याला सावध करणं,
मुलांच्या बरोबर खेळणं असं काहीतरी, पण तू त्याला सहा महिन्यांत काहीही शिकवलं नाहीस.
बायकोनं सांगितलं, 'अहो, त्याला जरा वेळ द्या नं. लग्नानंतर पहिले सहा महिने तुम्ही तरी
काय शिकलात ? नुसते घरी बसुनच होतात ना ? मग वर्षभरात कपबशा विसळणे, कांदा
चिरणे, चहा करणे अशी कामं सुरु करु लागलात तुम्ही. मोत्याही शिकेल तुमच्यासारखाच हळूहळू.


17. लंडन येथील इंडियन हायमध्ये बंगाली, पंजाबी, मद्रासी खूपच आहेत. मराठी लोकांना या उच्च नोक-
यांपासून कसे लांब ठेवावे, याबद्द्ल त्यांच्यात खल चालला होता. तेव्हा एक मद्रासी म्हणाला,
त्यांची तुम्ही काही काळजी करु नका. फ़क्त एका मराठी माणसाला इथं चांगली नोकरी द्या.
मग बाकीच्या मराठी लोकांना मज्जाव करण्याचं काम तो एकटा मराठी माणूस आनंदाने करील.


18. शेखर टेकाडे एका चित्रपट साप्ताहिकासाठी प्रसिध्द चित्रपट निर्माता शेठ लक्ष्मीचंद्र यांची मुलाखत
घेत होता. त्याने शेठजींना विचारले, 'चित्रपटस्रुष्टीत पैसे गुंतवणारे लोक लक्षाधीश होतात हे खरं
आहे का ?' 'खरं आहे', शेठ म्हणाले, 'सिनेमा डब्यात गेला की कोटयाधीश लगेच लक्षाधीश
होतात.'


19. एका भारतीय लेखकाला भेटण्यासाठी एक मोठा आफ्रिकन लेखक आला. तो म्हणाला, 'आमचे घराणे
तसे फार मोठे थोर आहे पण आमच्या नातेवाईंकापैकी एकजण खुनाच्या गुन्ह्यासाठी फाशी
गेला. त्यामुळे आम्हाला ती गोष्ट अगदी मनाला लागून गेली आहे. त्याचं सांत्वन
करण्यासाठी भारतीय लेखक म्हणाला, 'आमच्या घराण्यात कोणी फाशी गेला नाही हे खरं पण
ज्यांची लायकी फाशी जाण्याची आहे, असे दहावीस लोक आमच्या घराण्यात होऊन गेले आहेत.


20. बाळू हा बालवाडीत शिकत होता. परंतू अगदी लहानपणापासून तो खूप समजूतदार होता. प्रत्येकाला
तो मदत करायचा. एकदा त्याच्या वर्गात नव्यानेच गोडबोले बाई आल्या आणि प्रत्येकाला
'मोठेपणी तू कोण होणार? हा प्रश्न विचारण्यास सुरवात केली.' मग पोरांनी 'मी डाँक्टर
होणार,' 'मी वकील होणार,' अशी उत्तरे द्यायला सुरवात केली. शेवटी बाईनी पिंकीला प्रश्न
विचारला, 'काय गं तू मोठेपणी कोण होणार?' 'किनई बाई मी मोठेपणी आई होणार आहे.'
बाई या उत्तरावर काहीच बोलल्या नाहीत. त्यांनी सरळ बाळूला तोच प्रश्न विचारला. तेव्हा
बाळू डोळे पिंकीकडे लावीत उत्तरला. 'बाई-बाई, मी कीनई हिला आई बनवायला मदत करीन.'


21. उत्तर प्रदेशातील जयक्रुष्ण पांडे या धनाढ्य जमीनदाराचा मुलगा पाच वर्षे अमेरीकेत राहून भारतात
कायम वास्तव्यासाठी परत येणार होता. पांडे यांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. घरातल्या
दिवाणखाण्यात टेबलावर त्यांनी व्हिस्कीची बाटली, नोटांचं पुडकं, गीता हा धर्मग्रंथ आणि एक
पिस्तुल ठेवलं.
मग ते आपल्या पत्नीला व मित्राला म्हणाले, 'माझा मुलगा आल्याबरोबर जर त्यांन व्हिस्कीची बाटली
उचलली तर तो दारुड्या होईल. त्यानं नोटांचं पुडक उचललं तर तो व्यापारी होईल. त्यानं
गीता उचलली तर तो साधू होईल आणि जर त्याने पिस्तूल उचललं तर तो गुंड होईल.
मुलगा परदेशातून आला. घरात आल्याबरोबर त्याने टेबलावरच्या बाटलीतून व्हिस्की ग्लासात घेऊन
मद्यपान केलं. मग त्याने नोटांच पुडकं खिशात टाकलं, गीता काखोटीत मारली आणि
हातात पिस्तूल घेउन माजघरात प्रवेश केला.
हे सर्व लांबून पहात असणारे जयक्रुष्ण पांडे म्हणाले, 'अरे बाप रे. माझा मुलगा नक्कीच उत्तर
प्रदेशचा मुख्यमंत्री होणार. दिसेल ते सगळेच खिशात टाकतो आहे हा !'


22. दोन चोर रात्रीच्या वेळी सोनाराच्या दुकानात शिरले. त्यांनी सगळा माल लांबवण्यासाठी एकत्र केला.
तोच एका चोराची नजर त्या दागिन्यांवर लावलेल्या किंमतीकडे गेली. तो आपल्या
साथीदाराला म्हणाला, " काय चोर आहे लेकाचा, काय अफ़ाट किंमती ठेवल्या आहेत
दागिन्यांच्या, यांना गरीब लोकांच्या खिशावर डल्ला मारायला का आवडतं कोण जाणे?"


23. दोन मूर्ख एका होडीत बसून नदी पार करीत होते. त्यांची होडी नदीच्या मध्यभागी आली तोच
त्यांच्यातला एक म्हणाला, ' अरे.... अरे... बहुतेक होडीला तळाशी भोक पडलेल दिसतंय. होडी
बुडेल.' 'तू कशाला काळजी करतोस?', दुसरा त्याला म्हाणाला, 'होडी आपली कुठं आहे? भाड्याने
तर घेतलीय!'


24. पेपर संपल्यावर बाहेर येऊन दोन विद्यार्थी आपापसांत चर्चा करीत होते. एक म्हणाला, 'मला एकही
प्रश्न आला नाही. मी पेपर कोरा टाकला. तू काय केलंस?'
'मीसुध्दा पेपर कोराच टाकला. पण मी तुझ्यामागेच बसलो असल्यामुळे मी तुझी काँपी केली असं
बालटं येणार बघ तुझ्यावर.'


25. चाणाक्ष उद्योगपती फ़िरते विक्रेते म्हणून विवाहीत पुरुषांचीच निवड करतात. कारण त्यांना आँर्डर
घेण्याची सवय असते.


26. लक्ष्मीधराची जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या कोट्याधिशात गणना केली जात असे. एक दिवस
लक्ष्मीधर एकाएकी ॠदयविकाराच्या आजारानं मरण पावला, दुस-या दिवशी सगळ्या
वर्तमानपत्रात अगदी पहिल्या पानावर ती बातमी छापून आली. त्यांचा परिचय देतांना अखेर
म्हटलं होतं, लक्ष्मीधर हे निपुत्रिक असुन, त्यांच्या अवाढव्य संपत्तील कुणी वारस नाही.
त्यांच्या प्रेतयात्रेला प्रचंड गर्दी लोटली होती. जेव्हा त्यांच्या शवाला अग्नी देण्यात आला, तेव्हा
एक चांगले कपडे केलेला इसम धायमोकलून रडू लागला. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याच्याकडे
गेले. गर्दीत वर्तमानपत्रांचे अनेक बातमीदार होते. त्यापैकी एकाने त्याच्याजवळ जाऊन
विचारले, तुम्हाला फ़ार दुःख झालंय हे दिसतंच आहे, परंतु प्रत्येकाला एक ना एक दिवस
मरण हे आहेच. लक्ष्मीधर तुमचे नातलग होते का? 'नाही ना?' नो इसम म्हणाला, 'म्हणूनच
तर मला एवढं दुःख झालंय.


27. आँफ़िसमध्ये फ़िरत कामकाज पहात असतांना मँनेजरची दहा रुपयांची नोट कुठंतरी पडली. त्यानं
ती नोट कुणाला सापडली असेल तर ती आणून देण्यास सांगितले. मँनेजरची मर्जी संपादन
करण्यासाठी म्हणून कारकुनांसकट सर्वांनी शोधाशोध सुरु केली. साधारण अर्ध्या तासाने एका
प्युनने एक एकच्या दहा नोटा मँनेजरच्या समोर आणून ठेवल्या. त्याबरोबर मँनेजर चकीत
होऊन प्युनकडे पाहत म्हणाला 'अरे माझी दहा रुपयांची नोट हरवली आहे. एकेक रुपयांच्या
दहा नोटा नाही हरवल्या.' 'ते मला माहीत आहे साहेब' प्युन अगदी निर्विकारपणे म्हणाला,
'दहा रुपयांचीच नोट सापडली. मागच्या खेपेला आपली अशीच एक नोट हरवली होती आणि
ती मला सापडली होती. त्यावेळी आपल्याकडे सुटे पैसे नव्हते. ह्या खेपेला अडचण नको
म्हणून नोट सुटी करुन आणली.'


28. काँलेज हाँस्टेलमध्ये राहणा-या चार मुलींनी हाँस्टेल सुपरीटेंडेटकडे तक्रार केली की, समोरच्या
मुलांच्या हाँस्टेलमधील काही विद्यार्थी कपडे बदलतांना दारं लावून घेत नाहीत. तसंच रात्री
झोपतांना ते अंगावर काहीच कपडे नसताना झोपतात. ही तक्रार ऎकून हाँस्टेल सुपरीटेंडेट
काहीसे चकीत झाले. तक्रार खरोखरंच खरी आहे की काय हे पाहण्यासाठी म्हणून त्या चार
मुलींच्या खोलीत गेल्या. त्यांच्या खोलीतून त्यांनी समोरच्या हाँस्टेलातलं काही दिसतं की काय,
हे पाहावं म्हणून त्या खिडकीकडे गेल्या. परंतु तिथून काहीच दिसत नव्हतं. त्याबरोबर त्या
मुलींना म्हणाल्या, 'परंतु मला तर इथनं समोरच्या हाँस्टेलच्या खिडक्या दिसतच नाहीत.' एक
मुलगी पुढं होऊन म्हणाली, 'परंतु त्यासाठी खुर्चीवर उभं रहायला हवं.


29. रामू न्हावी एका माणसाची दाढी करीत होता. माणूस बराच लहरी होता. त्याने रामूला विचारले. 'काय
रे, कधी गाढवाची दाढी केली आहेस का?' 'नाही, हि पहिल्यांदाच करतोय.'रामू म्हणाला.


30. एका तरुण प्राध्यापकांवर लट्टू विद्यार्थीनीने त्यांना ग्रंथालयात एकटे गाठून म्हटले, 'सर आज
संध्याकाळी मला बराच वेळ मोकळा आहे. त्या वेळेत मी काय करावे?' प्राध्यापकांनी शांतपणे
म्हटले, 'परवा ट्यूटोरीयलमध्ये तुम्ही खूप चुका केलेल्या आहेत. त्या दुरुस्त करुन ट्युटोरीयल
लिहून काढा.'


31. वक्त्यांना नेहमी टाळ्या मिळतात. त्यांची वर्गवारी कशी करता? असं विचारल्यावर एक वक्त्ता
म्हणाला, 'भाषण सुरु होण्यापूर्वीच्या टाळ्या म्हणजे भाषण चांगलं होईल अशी आशा. भाषण
चालू असताना ब-याच वेळाने मिळणा-या टाळ्या म्हणजे, बसा आता, पुरे झालं. आणि
भाषण संपल्यावरच्या टाळ्या म्हणजे,सुटलो एकदाचा रटाळ भाषणाच्या तावडीतूनच्या टाळ्या.'


32. पुष्पा प्रथमच विरारहून जाण्यासाठी म्हणून लोकलमध्ये बसली होती. अंधेरीला गाडी थांबताच एक
फ़ँशनेबल तरुणी गाडीत चढली आणि पुष्पाच्या समोरच्या बाकावर बसली. पुष्पा काहीशा
कुतुहलानेच त्या तरुणीच निरीक्षण करु लागली. माहिमच्या खाडीजवळ येताच, त्या तरुणीने
आपली पर्स उघडून सेंटची बाटली काढली आणि खाडीतली दुर्गंधी शिरु नये म्हणून बाटली
उघडून नाकाला लावली. त्याचवेळी गाडीत खाडीचा दुर्गंध शिरला, त्याबरोबर नाक फ़ेंदारुन
पुष्पा त्या तरुणीकडे पाहात म्हणाली, 'ए बया, तुझी ती बाटली बंद कर की. किती घाण वास
आला तुझ्या त्या बाटलीचा.'


33. सुहासचा उदास चेहरा पाहून हाँस्टेलवरचा मित्र त्याला म्हणाला, 'का रे तब्येत बरी नाही का तुझी?'
'तब्येत बरी आहे रे 'मग? चेहरा असा का?' 'कालच वडिलांकडून पुस्तकांसाठी पैसे मागितले
होते आणि मनिआँर्डरची वाट पाहात होतो तर पुस्तकांचंच पार्सल आलं...'


34. मुंबईच्या एका हमरस्तावरन रमणलाल मोटारीने घरी चालले होते. तेवढ्यात हवालदाराने शिटी
मारुन त्यांना मोटार रस्त्याच्या कडेला घ्यायला सांगितली आणि त्यांच्याकडे ड्रायव्हींग
लायसन्सची मागणी केली. मला हे समजू शकत नाही रमणलाल म्हणाले, माझ्या हातून
काहीच चूक झालेली नाही तरी. 'असं मी केव्हा म्हटलं?' हवालदार म्हणाला, 'परंतु रस्त्यानं
मोटार इतक्या काळजीने चालवत होता की, तुमच्याकडे लायसन्स नसावं याची मला दाट
शंका आली.'


35. प्रख्यात इंग्लीश नाटककार जाँर्ज बर्नार्ड शाँ यांना एका प्रसिध्द चित्रपट अभिनेत्रीने विचारले. 'मी
तुझ्याशी लग्न करु इच्छिते.' 'कारण कळेल का?' 'लग्नानंतर आपल्याला जे मुल होईल ते
तुमच्याप्रमाणे बुध्दीमान आणि माझ्याप्रमाणे सुंदर होईल.' 'आणि उलट झालं तर?' शाँनी
विचारलं.


36. एक आडदांड माणूस हाँटेलातून बाहेर पडला. त्याच्या हातात छ्त्री होती. तोच दुसरा एक काळाकुळा
माणूस त्याच्यामागे धावत आला आणि त्याने त्या आडदांड माणसाला विचारले, 'आपण
चिंतामण चिकटे
का? ' 'नाही' ... तो गरजला.
'म ...म... मी चिंतामण चिकटे आणि तुमच्या हातातली छ्त्री चिंतामण चिकटेची आहे.' काळाकुळा
म्हणाला.


37. एकदा रवी खेळण्यांच्या दुकानात जाऊन एक बंदूक मागतो. दुकानदाराने बंदूक दिल्यानंतर त्याला
तो नकली नोट देतो. रवीने नकली नोट दिल्याचे दुकानदार त्याला सांगतो. तेव्हा रवी
म्हणतो, तुम्ही सुध्दा मला नकली बंदूक दिली ना.'


38. एका नवीन नाटककारानं लिहिलेल्या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला जेष्ठ नाटककार श्री
अमुकतमुक यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले होते. नाटक संपल्यावर
नाटककारानं श्री अमुकतमुक यांना अभिप्राय विचारल्यावर ते म्हणाले, नाटकाच्या
शेवटच्या सीनमध्ये नायक खलनायकाला सुरा खुपसून मारतो याऎवजी पिस्तुलाची गोळी
झाडून मारतो असं दाखवा. हा फ़रक कशासाठी, 'असं विचारल्यावर श्री अमुकतमुक
म्हणाले. ठो आवाजाने प्रेक्षक नक्की जागे होतील.'


39. एका हत्तीणीचे आँपरेशन झाल्यावर सर्जन नर्सला विचारले, सगळी हत्यारे व्यवस्थित परत ठेवलीत
ना? काही राहीले तर नाही ना? नर्स म्हणाली, 'सर हत्यारे सर्व मिळाली, पण डाँक्टर देशपांडे
कोठे दिसत नाहीत.'


40. एक प्रख्यात दरोडेखोर आरोपीच्या पिंज-यात उभा होता. न्यायाधिशाने त्याला विचारले, 'एकच घर तू
या आठवड्यात तीन वेळा फ़ोडलंस. तुला याबद्द्ल काही सांगायचंय का?' 'या मुंबईत
घरटंचाई किती आहे साहेब, हेच यावरुन सिध्द होत नाही का?'

