1. रवि गेला अस्ताला आकाशाला झाली गुलाबी उधळण ,
मला सतावत होते फ़क्त ......तुझीच आठवण.



2. फुलाकडे सहानुभूतीनं काय बघतेस त्याला देठाचा तरी आधार आहे ,
जरा माझ्या ह्रदयात डोकावून बघ तुझ्यावाचून सगळा अंधार आहे.



3. तुझी वाट पाहून शिणले डोळे आता पापणीही ढळेना ,
हुंदका देऊन रडावंसं वाटलं तर अश्रूही गळेना.



4. आयुष्यात प्रेमाच्या वाटेवर प्रसंगी काटेही बोचतात ,
हे माहित आहे मला तुझी साथ लाभणार असेल तर ,
तेही सहन करायला दुःख नाही होणार मला.



5. तुझी मूर्ती आता मी मनाच्या कप्प्यात बंद केलीय ,
तिच्यासाठी आता मी कायमस्वरुपी पुष्पमाला अर्पण केलीय.



6. तुझी आठवण ही नित्यनवा अनुभव आहे ,
कधी उसळणारे वादळं, तर कधी पाकळीवरचं दव आहे ,
मी तुला सोडून जाईन अशी वेळ कधीही येणार नाही ,
अशी वेळ आलीच तर मी तुझ्या आधीच निघून जाईन.



7. अनोळखी होतीस तू ओळख केलीस माझ्याशी ,
दोस्ती फक्त माझी करुनी प्रेम केलेस दुस-याशी.



8. इतकं प्रेम करु नये की प्रेम हेच जीवन होईल ,
कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल.



9. सहवास चार दिवसाचं वेड लावुन गेला ,
जाता जाता डोळयामध्ये अश्रू ठेवून गेला ,
आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील ,
सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहिल.



10. कळयांची फुले होताना गंधसुध्दा दरवळतो ,
तुझी वाट पाहताना जीव कसा व्याकुळतो.



11. प्रेमात तुझ्या जगण्यासाठी एकदा तरी भेटावंसं वाटतं ,
मिठीत तुझ्या दुःखांना विसरुन सारं जग विसरावसं वाटतं.



12. दीप माझ्या स्म्रुतीचा जपून जरा सांभाळ ,
कोणजाणे आयुष्याची केव्हा येईल संध्याकाळ.



13. दिल तोडायचं होतं तर आधी प्रेम करायला तरी का शिकवलंस ,
नंतर खुप रडवायचं होतस तर आधी हसवायला तरी का शिकवलसं.



14. तुझ्यासोबत सजवलेलं स्वप्नाचं घर मी कधीही तोडणार नाही ,
तू ये किंवा नको येऊस तुझी वाट पाहणं सोडणार नाही.



15. कधी कधी माझ्यावर तुझ्या आठवणीचा मेघ पसरतो ,
वाट पाहणा-या डोळयांतून गालावरती हळूच थेंब उतरतो.



16. फुलासारखी फुलत रहा ,सुगंधासारखी दरवळत रहा ,
डोळयात अश्रू आले तरी आयुष्यभर हसत रहा.



17. तुझी- माझी भेट कदाचित घडत राहील पुन्हा पुन्हा ,
पण प्रश्नच राहतोय तू कधी भेटशील पुन्हा ?



18. एक चारोळी माझ्य़ा मनात नकळत प्रेम बसवुन गेली ,
शेवटची ओळ मात्र ह्रदयाला फसवून गेली.



19. तु समोर आलीस की नुसतं तुला बघत असतो ,
आणि तू जवळ नसताना तुझ्या आठवणीसोबत जगत असतो.



20. सौदर्याची तु खाण अन अत्तराचा घडा ,
प्रेम कर माझ्याव नाहीतर होईन मी वेडा.



21. तरी ओठावर हसू दिसायला हवं ,
दूरवर गेलेल्या पावलांनी माझ्यासाठी वळायला हवं.



22. मी म्हणालो माग हवे ते ती म्हणाली ,
तुझे काही नको राजा सर्व काही दिले देवाने ,
आणि तूच एक फुटका पेला नशिबी माझ्या.



23. जीवनातील सारी सुखद स्वप्ने ओंजळीने भरुन घ्यावी ,
कितीही आडवळणे आली तरी ती तुला भरभरुन द्यावी.



24. माझ्या आयुष्याचं ध्येय मी आता ठरवलंय ,
म्हणूनच खेळकर मनाला मी थोडसं आवरलंय.



25. प्रेमभंगाचा धोका आणखी कोण खातोय ?
म्हणूनच मी आता एकटाच रहातोय.



26. लिहायचं तुला काही म्हणून हट्ट मनाने धरला ,
मजकूर सारा लिहिला पण मायनाच नेमका उरला.



27. रात्री माझ्या घरासमोर अंगण भरुन चांदणं पसरलं ,
सकाळी पाखरांनी चिवचिवाट केला आणि चांदणं अंगणाला विसरलं.



28. तू कुठेही रहा, सुखी रहा सुख माझॆ त्यातच आहे ,
कुठेही जा स्वतःला जपत रहा कारण माझा प्राण तुझ्यात आहे.



29. माझ्याही मनाच्या कोप-यात कधीकाळी बीज अंकुरलं होतं ,
पण तुझ्या एका नकाराने ते रुजण्या आधीच कोमेजून गेलं.



30. चालून चालून चालायचं असतं मधूनच वाकडं वळायचं असतं ,
असचं असतं जीवनाचं सार म्हणुन जीवन जगायचं असतं.



31. आपलं फ़सणार प्रेम हा नियतीचा खेळ आहे ,
आपण एकत्र यायला अजूनही वेळ आहे ,
काही क्षण असे असतात की जे विसरायचे नसतात ,
काही अश्रू असे असतात की जे दाखवायचे नसतात.



32. तुला कधीच विचारणार नाही मला का सोडलंस ?
तो मात्र सुदैवी आहे ज्याच्याबरोबर नवं नातं जोडलंस.



33. साथ तुझी हवी मला हे जीवन जगताना ,
आठवण तुझी येते मला मी एकटी असताना.



34. दुःख सारे विसरुन हसलो फ़क्त तुझ्याचसाठी ,
तूच सांग कधी रडलीस का माझ्यासाठी.



35. प्रेमाच्या सागरात अर्धवट सोडून दिलीस तू मला प्रेमाची सजा ,
परंतू तुला काय माहित असे प्रेम करण्यातच असते वेगेळी मजा.



36. जळणा-या वातीली प्रकाशाची साथ असते ,
नेहमी माझ्या मनात तुला भेटण्याची आस असते.



37. आता मी सुद्धा ठरवलंय अगदी तुझ्यासारखं वागायचं ,
तू हसलीस तर हसायचं तू रुसलीस तर रुसायचं.



38. ढग येतात पण पाऊस पडत नाही ,
आठवण येते पण चेहरा दिसत नाही ,
पुढे गाय मागे वासरु सांग प्रिये तुला कसे विसरु.



39. वेडी झाले तुझ्यासाठी जरी थांब आता थोडा तरी ,
कशासाठी करतोस अशी माझ्या मनाची अधोगती.



40. तुझ्याचसाठी जन्म घेतला तुझ्याचसाठी मरणार आहे ,
तुझ्यावाचून माझ्या जीवनाला अर्थ तरी काय उरणार आहे.



41. पावसाच्या थंडगार थेंबात चिंब चिंब भिजायचं असतं ,
जीवनातील दुःख विसरुन क्षण्भर जगायवं असतं.



42. प्रेम करणे हा गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे ,
तुझ्यासाठी शिक्षा भोगण्यास मी केव्हाही तयार आहे.



43. तू मला विसरली असलीस तरी मी नाही विसरणार ,
तुला कधी विसरतो का किनारा आपल्या अथांग सागराला ?



44. जीवनात दुःखाचा सागर असेल ,
जन्म आपण घेतला आहे ,
तर जीवेनात जगायलाच पाहिजे.



45. रात्र संपते दिवस उगवल्यावर ,
दिवस संपतो अंधार पडल्यावर ,
माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे ,
विसरु शकेन डोळे मिटल्यावर.



46. तारुण्या प्रेमाचा मोह कुणालाच आवरता येत नाही ,
बदनाम तोच होतो जो योग्य वेळी स्वतःलाच सावरत नाही.



47. ज्याला चेतना असतात त्याला वेदना होतात ,
अन ज्याला भावना असतात्त्यालाच यातना होतात..........\



48. जेव्हा काळाची वेळ येते तेव्हा वेळेत काळ घेऊन जातो ,
मातीत विलीन झाल्यावरही आत्मा मात्र अमर राहतो.



49. कुणी कुणाचा नसतो साथी ,
देहाची अंती होते माती ,
आपणच आपल्या जीवनाचे सोबती ,
मग कशाला हवीत हो खोटी नाती.



मला सतावत होते फ़क्त ......तुझीच आठवण.



2. फुलाकडे सहानुभूतीनं काय बघतेस त्याला देठाचा तरी आधार आहे ,
जरा माझ्या ह्रदयात डोकावून बघ तुझ्यावाचून सगळा अंधार आहे.



3. तुझी वाट पाहून शिणले डोळे आता पापणीही ढळेना ,
हुंदका देऊन रडावंसं वाटलं तर अश्रूही गळेना.



4. आयुष्यात प्रेमाच्या वाटेवर प्रसंगी काटेही बोचतात ,
हे माहित आहे मला तुझी साथ लाभणार असेल तर ,
तेही सहन करायला दुःख नाही होणार मला.



5. तुझी मूर्ती आता मी मनाच्या कप्प्यात बंद केलीय ,
तिच्यासाठी आता मी कायमस्वरुपी पुष्पमाला अर्पण केलीय.



6. तुझी आठवण ही नित्यनवा अनुभव आहे ,
कधी उसळणारे वादळं, तर कधी पाकळीवरचं दव आहे ,
मी तुला सोडून जाईन अशी वेळ कधीही येणार नाही ,
अशी वेळ आलीच तर मी तुझ्या आधीच निघून जाईन.



7. अनोळखी होतीस तू ओळख केलीस माझ्याशी ,
दोस्ती फक्त माझी करुनी प्रेम केलेस दुस-याशी.



8. इतकं प्रेम करु नये की प्रेम हेच जीवन होईल ,
कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल.



9. सहवास चार दिवसाचं वेड लावुन गेला ,
जाता जाता डोळयामध्ये अश्रू ठेवून गेला ,
आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील ,
सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहिल.



10. कळयांची फुले होताना गंधसुध्दा दरवळतो ,
तुझी वाट पाहताना जीव कसा व्याकुळतो.



11. प्रेमात तुझ्या जगण्यासाठी एकदा तरी भेटावंसं वाटतं ,
मिठीत तुझ्या दुःखांना विसरुन सारं जग विसरावसं वाटतं.



12. दीप माझ्या स्म्रुतीचा जपून जरा सांभाळ ,
कोणजाणे आयुष्याची केव्हा येईल संध्याकाळ.



13. दिल तोडायचं होतं तर आधी प्रेम करायला तरी का शिकवलंस ,
नंतर खुप रडवायचं होतस तर आधी हसवायला तरी का शिकवलसं.



14. तुझ्यासोबत सजवलेलं स्वप्नाचं घर मी कधीही तोडणार नाही ,
तू ये किंवा नको येऊस तुझी वाट पाहणं सोडणार नाही.



15. कधी कधी माझ्यावर तुझ्या आठवणीचा मेघ पसरतो ,
वाट पाहणा-या डोळयांतून गालावरती हळूच थेंब उतरतो.



16. फुलासारखी फुलत रहा ,सुगंधासारखी दरवळत रहा ,
डोळयात अश्रू आले तरी आयुष्यभर हसत रहा.



17. तुझी- माझी भेट कदाचित घडत राहील पुन्हा पुन्हा ,
पण प्रश्नच राहतोय तू कधी भेटशील पुन्हा ?



18. एक चारोळी माझ्य़ा मनात नकळत प्रेम बसवुन गेली ,
शेवटची ओळ मात्र ह्रदयाला फसवून गेली.



19. तु समोर आलीस की नुसतं तुला बघत असतो ,
आणि तू जवळ नसताना तुझ्या आठवणीसोबत जगत असतो.



20. सौदर्याची तु खाण अन अत्तराचा घडा ,
प्रेम कर माझ्याव नाहीतर होईन मी वेडा.



21. तरी ओठावर हसू दिसायला हवं ,
दूरवर गेलेल्या पावलांनी माझ्यासाठी वळायला हवं.



22. मी म्हणालो माग हवे ते ती म्हणाली ,
तुझे काही नको राजा सर्व काही दिले देवाने ,
आणि तूच एक फुटका पेला नशिबी माझ्या.



23. जीवनातील सारी सुखद स्वप्ने ओंजळीने भरुन घ्यावी ,
कितीही आडवळणे आली तरी ती तुला भरभरुन द्यावी.



24. माझ्या आयुष्याचं ध्येय मी आता ठरवलंय ,
म्हणूनच खेळकर मनाला मी थोडसं आवरलंय.



25. प्रेमभंगाचा धोका आणखी कोण खातोय ?
म्हणूनच मी आता एकटाच रहातोय.



26. लिहायचं तुला काही म्हणून हट्ट मनाने धरला ,
मजकूर सारा लिहिला पण मायनाच नेमका उरला.



27. रात्री माझ्या घरासमोर अंगण भरुन चांदणं पसरलं ,
सकाळी पाखरांनी चिवचिवाट केला आणि चांदणं अंगणाला विसरलं.



28. तू कुठेही रहा, सुखी रहा सुख माझॆ त्यातच आहे ,
कुठेही जा स्वतःला जपत रहा कारण माझा प्राण तुझ्यात आहे.



29. माझ्याही मनाच्या कोप-यात कधीकाळी बीज अंकुरलं होतं ,
पण तुझ्या एका नकाराने ते रुजण्या आधीच कोमेजून गेलं.



30. चालून चालून चालायचं असतं मधूनच वाकडं वळायचं असतं ,
असचं असतं जीवनाचं सार म्हणुन जीवन जगायचं असतं.



31. आपलं फ़सणार प्रेम हा नियतीचा खेळ आहे ,
आपण एकत्र यायला अजूनही वेळ आहे ,
काही क्षण असे असतात की जे विसरायचे नसतात ,
काही अश्रू असे असतात की जे दाखवायचे नसतात.



32. तुला कधीच विचारणार नाही मला का सोडलंस ?
तो मात्र सुदैवी आहे ज्याच्याबरोबर नवं नातं जोडलंस.



33. साथ तुझी हवी मला हे जीवन जगताना ,
आठवण तुझी येते मला मी एकटी असताना.



34. दुःख सारे विसरुन हसलो फ़क्त तुझ्याचसाठी ,
तूच सांग कधी रडलीस का माझ्यासाठी.



35. प्रेमाच्या सागरात अर्धवट सोडून दिलीस तू मला प्रेमाची सजा ,
परंतू तुला काय माहित असे प्रेम करण्यातच असते वेगेळी मजा.



36. जळणा-या वातीली प्रकाशाची साथ असते ,
नेहमी माझ्या मनात तुला भेटण्याची आस असते.



37. आता मी सुद्धा ठरवलंय अगदी तुझ्यासारखं वागायचं ,
तू हसलीस तर हसायचं तू रुसलीस तर रुसायचं.



38. ढग येतात पण पाऊस पडत नाही ,
आठवण येते पण चेहरा दिसत नाही ,
पुढे गाय मागे वासरु सांग प्रिये तुला कसे विसरु.



39. वेडी झाले तुझ्यासाठी जरी थांब आता थोडा तरी ,
कशासाठी करतोस अशी माझ्या मनाची अधोगती.



40. तुझ्याचसाठी जन्म घेतला तुझ्याचसाठी मरणार आहे ,
तुझ्यावाचून माझ्या जीवनाला अर्थ तरी काय उरणार आहे.



41. पावसाच्या थंडगार थेंबात चिंब चिंब भिजायचं असतं ,
जीवनातील दुःख विसरुन क्षण्भर जगायवं असतं.



42. प्रेम करणे हा गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे ,
तुझ्यासाठी शिक्षा भोगण्यास मी केव्हाही तयार आहे.



43. तू मला विसरली असलीस तरी मी नाही विसरणार ,
तुला कधी विसरतो का किनारा आपल्या अथांग सागराला ?



44. जीवनात दुःखाचा सागर असेल ,
जन्म आपण घेतला आहे ,
तर जीवेनात जगायलाच पाहिजे.



45. रात्र संपते दिवस उगवल्यावर ,
दिवस संपतो अंधार पडल्यावर ,
माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे ,
विसरु शकेन डोळे मिटल्यावर.



46. तारुण्या प्रेमाचा मोह कुणालाच आवरता येत नाही ,
बदनाम तोच होतो जो योग्य वेळी स्वतःलाच सावरत नाही.



47. ज्याला चेतना असतात त्याला वेदना होतात ,
अन ज्याला भावना असतात्त्यालाच यातना होतात..........\



48. जेव्हा काळाची वेळ येते तेव्हा वेळेत काळ घेऊन जातो ,
मातीत विलीन झाल्यावरही आत्मा मात्र अमर राहतो.



49. कुणी कुणाचा नसतो साथी ,
देहाची अंती होते माती ,
आपणच आपल्या जीवनाचे सोबती ,
मग कशाला हवीत हो खोटी नाती.



No comments:
Post a Comment